अहमदनगर :- माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा खून करणाऱ्या राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील दोघांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी हा निकाल दिला. पती गोविंद सर्जेराव हारदे (वय ३८), सासरा सर्जेराव हारदे (रा. राहुरी, तुळापूर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. २०१३ मध्ये वैशाली हारदे हिचा खून करण्यात आला होता.
या खटल्यात सरकारी वकिल केदार केसरकर यांनी दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविली होती. साक्षीदारांची साक्ष, दाखल कागदपत्रे, परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपींना दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा सुनावली.
तर सासूविरुद्ध पुरावे नसल्याने तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. लग्न झाल्यानंतर दोन मुली व एक मुलगा झाल्यानंतर वैशाली हारदे हिचा सासरच्या लोकांकडून छळ करण्यास सुरूवात करण्यात आली. माहेरून चारचाकी गाडी आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता.
- Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची मजाच मजा, ‘या’ बँका एक लाखाच्या गुंतवणुकीवर देत जबरदस्त परतावा, बघा व्याजदर…
- PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत १५० पदांसाठी भरती सुरु, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!
- भारतीय कार बाजारात टोयोटाच्या ‘या’ लोकप्रिय SUV कारचे नवीन वॅरीयंट लाँच ! किंमत अन फिचर्स कसे आहेत ? वाचा सविस्तर
- BMC Bharti 2024 : मुंबई महानगरपालिका मध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली भरती, वाचा सविस्तर…
- Maharashtra Politics : फडणवीसांना जेलमध्ये टाकायचे, भाजपचे २५ आमदार फोडायचे.. एकनाथ शिंदेंनी आज सांगून टाकला प्लॅनिंग