जामखेड :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षांत देशाची वाट लावली. यापुढे ते हेच करणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या २९४ व्या जयंतीनिमित्त आंबेडकर यांनी चोंडीला भेट देऊन स्मृतिस्तंभास अभिवादन केले. पालकमंत्री राम शिंदे यांनी घोंगडी देऊन त्यांचा सत्कार केला.
पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले, भाजप हटवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी हा पर्याय नाही. राष्ट्रवादी हा काँग्रेसमध्ये विलीन होत आहे. ते घाबरले आहेत.
मुस्लिम समाज त्यांच्याकडून निसटून चालला आहे. त्यांनी मुस्लिम समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. त्यामुळे ते वंचित आघाडीकडे आकर्षित होत आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादीने विधानसभेसाठी प्रस्ताव दिला आहे का, असे विचारले असता आंबेडकर म्हणाले, तसा प्रस्ताव आलेला नाही. वृत्तपत्रे व वाहिन्यांवर चर्चा चालू आहे.
त्यांच्याकडे जायचे कशासाठी? वंचितसाठी काय अजेंडा त्यांच्याकडे आहे? अजेंडा असल्याशिवाय काही शक्य नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे आंबेडकर म्हणाले.
- Ahmednagar News : रात्री लक्ष्मी देवीच्या यात्रेत खून ! छबिन्यात सात ते आठ जणांनी टाकला डाव, अहमदनगरमधील घटना
- Breaking : निवडणुकांच्या धामधुमीत आमदाराच्या कुटुंबाचा भीषण अपघात ! चौघे ठार
- यंदाच्या लोकसभेत प्रमुख पक्षांकडून मुस्लिम बांधवांना डावलले ! एकही मुस्लीम उमेदवार नाही, पहा चित्र..
- Ahmednagar News : पाणीबाणी ! वीजपुरवठ्याचाही होतोय बट्ट्याबोळ, उन्हाच्या कडाक्यात पाणीपुरवठा विस्कळित
- मे महिन्यातील रखरखत्या उन्हात अनुभवायची असेल हिवाळ्यातील थंडी तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट! वाचा माहिती