अहमदनगर :- लोणीकरांचा अन्याय आणि पंतप्रधान रोजगार मिळवण्यासाठी तरुणांना वडे भजे तळून पैसे कमवण्याचा देत असलेले फुकटचा सल्ला युवाशक्तीला अपमानित करत आहे.
भाजपकडून तरुणांची होत असलेली थट्टा व लोणीकरांची दादागिरी आता युवक सहन करणार नाही, असा इशारा केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिला.
तनपुरेवाडी, अकोला, येळी, भुते टाकळी, शेकटे, येळी, खरवंडी गावातील नागरिकांशी संवाद साधून राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी गाठीभेटी घेतल्या. यावेळी ढाकणे बोलत होते.
यावेळी भीमराव फुंदे, बाळासाहेब ताठे, बंडू बोरुडे, सिताराम बोरुडे, किरण खेडकर, शिवशंकर राजळे, भाऊ तुपे, सुधीर पोटे, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप यांनी २३ तारखेला मतदानाच्या माध्यमातून दादागिरी आणि पंतप्रधानांकडून तरुणांची होत असलेली थट्टा थांबण्यासाठी मोदींना व लोणीकरांना घरी पाठवा, असे आवाहन केले.
- शेणखताचा पिकांना फायदा होण्यासाठी ‘अशा पद्धती’ने करावा वापर! नाहीतर फायदा होण्याऐवजी होईल नुकसान
- निव्वळ योगायोग ! पवारांचे निकटवर्तीय अभिजित पाटील व फडणवीसांच्या भेटी, भाजप उमेदवारांना दिला पाठिंबा अन तिकडे शिखर बँकेकडून दिलासा, जप्तीची कारवाई मागे
- Health Tips: ‘या’ गोष्टींची काळजी घ्याल तर कधीच नाही होणार ऍसिडिटी! घ्या काळजी आणि मिळवा ऍसिडिटी पासून मुक्तता
- जयंत पाटलांना पोहोचवले अन् सुषमा अंधारेंना न्यायला आले, तेच हेलिकॉप्टर कोसळले अन डोळ्यादेखत तुकडेतुकडे झाले..
- पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्वमेध कुणी रोखू शकणार नाही: डॉ. सुजय विखे पाटील