मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. मुंबईत चार दिवसांसाठी सर्व प्रकारची दारुविक्री बंद राहणार असल्याची माहिती मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत सलग तीन दिवस तसेच २४ ऑक्टोबर रोजी एक दिवस अशा एकूण चार दिवसांसाठी मुंबई शहरात सर्व प्रकारच्या दारुविक्रीवर बंदी असेल त्यामुळे सर्व दारुची दुकाने बंद ठेवण्यात येतील.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत नुकतीच संपली असून आता अर्जांची छाननी सुरु आहे. उद्या ७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर एकदा उमेदवारी निश्चित झाली की दोन दिवसांत प्रचाराचे नारळ फुटतील आणि राज्यात प्रचाराला वेग येईल. दरम्यान, राज्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
- High Return On FD : एफडीमधून कमाई करायची असेल तर ‘या’ बँकांमध्ये करा गुंतवणूक, देतायेत आकर्षक व्याजदर!
- Ahmednagar News : अहमदनगरमधील बांधकाम व्यावसायिकावर चाकूने वार करत ५० लाख लांबवले ! आरोपी सापडेना, मित्राचेच कृत्य ?
- Samsung Galaxy : सॅमसंगच्या ‘या’ प्रीमियम फोनवर मिळत आहे 21 हजार रुपयांची झटपट सूट, येथे सुरु आहे खास ऑफर…
- Mahindra SUV : मार्केटमध्ये येताच महिंद्राच्या ‘या’ स्वस्त एसयूव्हीने वाढवले टाटा आणि कियाचे टेन्शन, बघा किंमत!
- Ahmednagar Politics : पावणे पाच वर्ष सत्ताधारी आमदार असताना दूध, कांदा प्रश्नावर आवाज का नाही उठवला? खा.सुजय विखेंचा लंके यांच्या वर्मावर घाव