अहमदनगर :- नाशिक व नगरमधील धरणांतून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पाणी विसर्गामुळे जायकवाडी ६५.४१ टक्के भरले आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगरमधून आता जायकवाडीस पाणी सोडण्याची गरज नसून, दोन्ही जिल्ह्यांची चिंता मिटली आहे.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिकमधून ७५ टीएमसीवर पाणी विसर्ग जायकवाडीसाठी केला आहे. गंगापूर धरणात ९०.७१ टक्के साठा कायम असून, त्यातून ५१०४ क्युसेकचा, तर दारणात ८९.६४ टक्के साठा कायम करत त्यातून ५३६० क्युसेक विसर्ग आहे.
कडवातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नांदूर-मधमेश्वरमधून २९ हजार क्युसेकने पाणी विसर्ग सुरूच आहे.शिवाय २ दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता हा विसर्ग पुन्हा वाढण्याची तीव्र शक्यता आहे. त्यातून जायकवाडीस आवक अधिक होईल.
- Best Affordable Cars : 5.50 लाख रुपयांच्या ‘या’ कारची चर्चा सर्वत्र, एप्रिल महिन्यात झाली सर्वाधिक विक्री!
- Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललय काय? लिलाव नाहीत तरी मुबलक वाळू, शहरासह ग्रामीण भागात कामे जोरात सुरु, वाळूचोरीने लाखोंच्या महसुलावर पाणी
- Samsung Galaxy : 80 हजाराचा फोन फक्त 25 हजार रुपयांमध्ये, कुठे सुरु आहे ऑफर? बघा एका क्लिकवर…
- तुम्हीही बाईकप्रेमी आहात का? ‘या’ आहेत बजेट फ्रेंडली दमदार परफॉर्मन्स असलेल्या अप्रतिम बाईक! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये
- Ahmednagar News : संसार अर्ध्यावरती सोडत एकामागोमाग चार युवकांचा मृत्यू ! सावधानतेचा इशारा, अहमदनगर शोकसागरात