पारनेर : राजकीय पक्ष आणि पार्ट्यांमुळे खेड्यांचा विकास थांबला आहे. पर्यायाने देशाच्या विकासाला खीळ बसली प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. राळेगणसिद्धी येथे पार पडलेल्या सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या कार्यक्रमप्रसंगी हजारे बोलत होते.
या वेळी महासंघाचे अध्यक्ष नामदेव घुले, सरचिटणीस अशोक सब्बन, सहचिटणीस दत्ता आवारी, उपाध्यक्ष कैलास पटारे, उपाध्यक्ष रोहिणी गाजरे, संघटक प्रवीण साठे, खजिनदार डॉ. प्रशांत शिंदे, राजाराम गाजरे व विविध जिल्ह्यांतील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
हजारे म्हणाले, गावातील एक गट चांगला काम करत असेल, तर दुसरा गट त्याला विरोध करतो. कारण पक्ष आणि पार्टीमुळे गावातील लोक दोन गटांत विभागले गेलेले आहेत.
गावातील लोकांनी घटनेच्या कलम ८४ ‘ख’ व ‘ग’ नुसार पक्ष-पार्टीविरहित निवडणूक लढवण्याचे आवाहन हजारे यांनी केले. असे झाले तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल.
- Post Office पेक्षा जबरदस्त परतावा देणारी LIC ची योजना, दररोज 45 रुपये जमा केल्यास मिळणार 25 लाख रुपये ! कोणती आहे ही योजना ?
- 30 एप्रिलपासून कस राहणार महाराष्ट्रातील हवामान ? पावसाची स्थिती काय राहणार ? जाणून घ्या सविस्तर
- Ahmednagar News : कार व दोन दुचाकींचा भीषण अपघात ! एक ठार तर एक जखमी
- Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये एमआयएमने माघार का घेतली? मुस्लिम समाजानेच त्यांचा एकजुटीने केला विरोध? बदलती समीकरणे दक्षिणेत ट्विस्ट आणणार
- DY Patil Vidyapeeth : प्राध्यापक होण्याची उत्तम संधी! पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध विद्यापीठात सुरुये भरती…