अहमदनगर :- भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त घोषणा करून त्यांची चेष्टा केली. त्यांना सन्मानाने जगण्यासाठी कधी शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाही.
शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी दिली. पण अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीस लावले, अशी भावना राष्ट्रवादीत आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरमध्ये नगर, श्रीगोंदे, जामखेड व कर्जत तालुक्यांमधील प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
शेतकऱ्यांचे खरे सरकार येण्यासाठी राष्ट्रवादीत दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले. अंजना पवार, महेश जगताप, संदीप सुरवसे, संतोष कोकाटे, शारदा ठोंबरे, कमला माळी, शंकर पवार, हाजी इम्रान युसूफ, शहाजी गोरे, दिलीप कांकरिया हे राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले.
- Bhagini Nivedita Sahakari Bank : पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील भगिनी निवेदिता सहकारी बँकेत निघाली भरती…
- Ahmednagar Politics : लोकसभेच्या प्रचारात कांदाभावाची फोडणी ! दोन्ही बाजूच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांना प्रचारात करावा लागतोय रोषाचा सामना
- SNJB Nashik Bharti 2024 : नाशिकमधील SNJB येथे विविध पदांसाठी निघाल्या जागा, अर्ज पद्धती जाणून घेण्यासाठी वाचा बातमी!
- निसर्गानेच गाऱ्हाणे ऐकले? पैठणचा उजवा कालवा फुटला अन.. ८५ गावांना फायदा झाला
- Ahmednagar Politics : लीडच्या गप्पा नको, मताधिक्य मिळेल या गैरसमजात राहू नका..! अनुभवी आ. थोरातांनी आपल्याच उमेदवारास का दिला सल्ला? काय फिरतायत राजकीय गणिते ?