कोपरगाव : मतदारसंघातील शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी पुकारलेला संप तालुक्याच्या आमदारांनी मोडून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीपासून वंचित ठेवले. त्यामुळे आजही मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी उपोषणाला बसावे लागते.
मी शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही, असा विश्वास कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी दिला. संवत्सर, कोकमठाण, कान्हेगाव, सडे, बोलकी, खिर्डी गणेश, येसगाव आदी ठिकाणी काळे यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या.
गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना सात नंबर फॉर्म भरून देखील पाणी मिळाले नाही. गावतळे भरून मिळावे यासाठी शेतकरी पोळ्याच्या सणाच्या दिवशी तहसीलसमोर उपोषण करीत होते.
दसऱ्याच्या दिवशीही शेतकरी बंधाऱ्यात पाणी सोडावे म्हणून उपोषणाला बसले होते, तर चांदेकसारेचे शेतकरी दुष्काळ जाहीर व्हावा म्हणून जिवंतपणी सरणावर बसले होते, असे काळे म्हणाले.
- वादळी पावसाचा मुक्काम वाढला ! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस सूरु राहणार वळवाचा पाऊस, हवामान खात्याचा नवीन अंदाज जाहीर
- ११ व्या स्थानावर असेललेली अर्थव्यवस्था मोदीजींनी ५ व्या स्थानावर आणली – खा. सुजय विखे पाटील
- Maharashtra Politics : अजित पवार गटास केवळ दोनच जागा ! साताऱ्यात राजे नडले तर नाशिकमधून भुजबळांची माघार, अजित पवारांसोबत महायुतीत नेमकं काय घडलं पहा..
- SBI Home Loan EMI : जर तुम्हाला SBI कडून 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घ्यायचे असेल तर 25 वर्षांसाठी तुम्हाला किती EMI भरावा लागेल, जाणून घ्या…
- SBI vs HDFC Bank: 5 वर्षांकरिता 5 लाखांची एफडी केली तर कुठे मिळेल जास्त फायदा? वाचा संपूर्ण माहिती आणि घ्या फायदा