नगर : संग्राम जगताप हे केवळ नगर शहराचे उमेदवारच नाहीत, तर या उमेदवाराच्या मागे शरद पवार यांचे विचार आहेत. संग्राम जगताप हा शहर विकासाला पुढे घेऊन जाणारा चेहरा आहे. तरुणांना रोजगार मिळावा, शहराचे प्रश्न सुटावेत, यासाठी जगताप यांनी प्रयत्न केले, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी शनिवारी केले.
नगर शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या माळीवाडा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. नगरकरांनी मला संधी दिली.
नगरकरांनी दिलेल्या या संधीमुळेच पाच वर्षांत शहरातील उपनगरांमध्ये चांगल्या पध्दतीचे काम करू शकलो. नगर शहर उपनगरात अनेक विकासकामातून एक दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
त्याच माध्यमातून तरुण पिढीला आयटी पार्कच्या माध्यमातून पाच वर्षांत ४०० ते ५५० तरुणांना नोकरी देण्याचे काम केले असल्याचे जगताप यांनी सांगितले. या वेळी प्रा. अरविंद शिंदे, माजी उपमहापौर दीपक सूळ, माजी नगरसेवक अविनाश घुले, निखिल वारे, उबेद शेख, राधेश्याम शर्मा आदींची भाषणे झाली.
- Ahmednagar Crime : गुंड प्रविण रसाळला उच्च न्यायालयाचा पुन्हा दणका
- OnePlus India : नवीन डिझाईन आणि प्रीमियम लूकसह लॉन्च होणार वनप्लसचा ‘हा’ नवीन फोन; कधी करणार मार्केटमध्ये एंट्री बघा…
- अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवड योजनेसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी! वाचा यासाठीची अर्ज प्रक्रिया आणि योजनेची माहिती
- भीषण पाणीटंचाई, तरी प्रवरा नदीत पाणी सोडण्यास विरोध
- मुळा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा, नदी पात्राचे वाळवंटात रूपांतर !