तिसगाव : शेतकऱ्यांचा आम्ही आदर करतो. चेक पाठवणारा या योजनेचा लाभार्थी होता का? त्याच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. मी भाषण कर्जत-जामखेडला केले. मात्र, चेक संगमनेरचा माणूस देतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास करून मला बदनाम करण्यात आले, असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला.
विखे म्हणाले, आम्ही केलेल्या कामाची मते मागत असून विरोधक खोटेनाटे आरोप करत आहेत. आजची दुष्काळी परिस्थिती आपण पहात असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. शेतकऱ्यांवर गोळीबार केला, धरणाबद्दलची अश्लिल भाषा वापरली, त्यावेळेस डोळे पाणवले का नाही.
सिंचन घोटाळा, बँक घोटाळा करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना जेलमध्ये जावेच लागेल. राहुरी तालुक्यातील नावारूपाला आलेल्या अनेक संस्था तनपुरेंनी बंद पाडल्याने ते काय मतदारसंघाचा विकास करणार. तिसगावला पाणीटंचाई आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जातील.
- ‘या’ युवा शेतकऱ्याने सुरू केले अद्रक वॉशिंग सेंटर आणि स्वतःसह दिला 400 ते 450 लोकांना रोजगार! वाचा या शेतकऱ्याची यशोगाथा
- आता ओटीपीमुळे नाही होणार पैशांची फसवणूक! ताबडतोब मिळणार धोक्याची सूचना, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन?
- मध्य रेल्वेने कोकणवासीयांना दिला दिलासा! उन्हाळ्याच्या सुट्टीत गर्दीमुळे सुरू केल्या 38 अतिरिक्त गाड्या,वाचा या गाड्यांचे वेळापत्रक आणि थांबे
- तुम्हाला माहिती आहे का लोकसभेत फक्त 1 दिवसाचे खासदार कोण ठरले होते? शिवसेनेआधी धनुष्यबाण चिन्हावर लढवली होती निवडणूक
- अहमदनगर ब्रेकिंग : लोकसभा निवडणुकीत ह्या 6 उमेदवारांचे अर्ज ठरले अवैध ! पहा 36 उमेदवारांची नावे…