जामखेड: मकरंद अनासपुरेच्या चित्रपटात जशी विहीर चोरीला गेली,तशी कर्जत जामखेड मतदारसंघातील हायमॅक्स, चावडी, बगीचा, रस्ते ही कामे चोरीला गेली आहेत.
चार लोकं मोठी होत असतील त्याला विकास म्हणत नाहीत, तर सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारते, त्याला विकास म्हणतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी धामणगाव येथे केले.
तालुक्यातीलआनंदवाडी, धामणगाव, तेलंघश, गीतेवाडी, दरडवाडी, चव्हाणवाडी, सातेफळ,पांढरेवाडी आदी गावांचा गावभेट दौरा करत पवार यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.
प्रत्येक गावात लावलेल्या विकासाच्या फ्लेक्सवर रोहित पवार यांनी टीका केली. पवार म्हणाले, या भागातून ऊसतोड करण्यासाठी जाताना कामगार दिसतात.मला भविष्यात एवढे काम करायचे आहे की, कोणालाही ऊस तोडणीसाठी जावे लागणार नाही.
तरुणांना रोजगार,महिलांच्या हाताला काम देण्याचा मंत्र्यांनी कधी प्रयत्न केला नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना ते कधी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले का? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
- NIN Bharti 2024 : पुण्यातील राष्ट्रीय पोषण संस्थेत निघाली भरती, अशा पद्धतीने करा अर्ज!
- CBI Bharti 2024 : परीक्षेशिवाय CBI मध्ये नोकरी मिळण्याची उत्तम संधी; जाहिरात प्रकाशित
- DIAT Pune Bharti 2024 : पदवीधारक आहात आणि नोकरी शोधताय?, मग वाचा ही बातमी…
- Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठात शिपाई आणि ‘या’ पदांची निघाली भरती; शिक्षण 12 वी पास, आजच करा अर्ज!
- Ahmednagar News : स्कुलबस दुचाकीचा भीषण अपघात ! एकाच कुटुंबातील दोघे ठार