‘सत्ताधाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

टाकळीमानूर :- विकासकामांना मंजुरी असो नसो. गावागावात नारळ फोडण्याचा धडाका सत्ताधाऱ्यांनी लावला असून, जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. नारळं फोडलेली विकासकामे होणे गर्जेची होती.

निवडणूक जवळ आल्याने विकासकामांची आमिषे दाखविली ज़ात आहेत, जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे प्रतिपादन केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲड. प्रताप ढाकणे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेतील कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी पं. स. सदस्य किरण खेडकर, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष पंढरीनाथ केकाण, सरपंच गयाबाई ढाकणे, माजी उपसरपंच राजेंद्र जगताप, दिलीप पवळे, वसंत खेडकर, अंबादास राऊत, अंबादास घुले, मच्छिंद्र पवळे, महारुद्र कीर्तने,

शहादेव ढाकणे, अनिल खेडकर, बाबासाहेब राऊत, सलीम बागवान, विष्णू थोरात, धोंडीराम केळगंद्रे, विठ्ठल ढाकणे, मालेवाडीचे सरपंच पांडुरंग खेडकर, उपसरपंच शहादेव कीर्तने आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक ढोले यांनी केले. रवींद्र फुंदे यांनी आभार मानले.

Leave a Comment