नवी दिल्ली – बँक ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. सामान्यपणे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतील काम सकाळी १० वाजता सुरू हाेते. मात्र, अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व सार्वजनिक क्षेत्रातील आणि ग्रामीण बँका सकाळी ९ वाजता उघाडतील.
देशभरातील सर्व बँका एकाच वेळी सुरू व्हाव्यात या उद्देशाने केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या विभागाने जूनमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती.
या बैठकीत सर्व शाखा ग्राहकांच्या सोयीनुसार सुरू करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार या बदलाला मंजुरी मिळाली आहे. आयबीएने २४ जून रोजी ग्राहकांच्या सुविधांवर स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीच्या बैठकीत बँकांच्या शाखा उघडण्यावर तीन पर्याय दिले होते.
पहिला, सकाळी ९ ते दुपारी तीन वाजेपर्यंत. दुसरा, सकाळी १० ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आणि तिसरा, सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत. आयबीएने बँकांना ३१ ऑगस्टपर्यंत जिल्हा पातळीवरील ग्राहक समन्वय समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यास तसेच त्यांची सूचना स्थानिक वृत्तपत्रांत देण्यास सांगितले होते.
वास्तविक ज्या ठिकाणी ग्राहकांना उशिरापर्यंत बँकिंग सेवा हवी आहे, त्या ठिकाणी आधीप्रमाणेच सकाळी १० किंवा ११ वाजता बँका सुरू ठेवण्याचा पर्याय उपलब्ध राहील.
- Nilesh Lanke Property : साडेचार वर्षात कमी झालेल्या संपत्तीबददल निलेश लंकेंनी स्पष्टच सांगितलं ! समाजासाठी काम…
- उद्योजकांच्या पाठीशी उभा राहणारा खासदार निवडून द्यावा लागेल – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- निलेश लंके यांच्या प्रचारार्थ महाआघाडीचा नगर तालुक्यात प्रचार दौरा ! गावागावात जाणार
- काळजी घ्या…! महाराष्ट्रातील ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता, अनेक भागात वादळी पाऊस, IMD चा नवीन अंदाज बघितला का ?
- SNJB Nashik Bharti 2024 : नाशिकमध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी; वाचा सविस्तर माहिती!