लोणी : सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जयंती दिन हा शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्याच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, विकास व मत्सव्यवसाय विभागाने घेतला आहे.
डॉ. विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरीता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान म्हणुन नारळी पौर्णिमेच्या दिवशी असलेला त्यांचा जन्मदिवस हा शेतकरी दिन म्हणुन साजरा केला जातो.
राज्यसरकारने १४ ऑगस्ट २०१४ रोजी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा तिथीप्रमाणे येणारा जन्मदिवस हा शेतकरी दिन म्हणुन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दरवर्षी शासनाच्या वतीने कृषि व पशुसंवर्धन विभाग हा शेतकरी दिन सर्वत्र साजरा होण्याच्या दृष्टीने निर्देश निर्गमित करीत असते.
यावर्षी संबंधित विभागाने १४ ऑगस्ट २०१९ रोजी पद्मश्रीचा जयंतीदिन तिथीप्रमाणे शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी दिनाच्या निमित्ताने शेतकरी मेळावे व कृषि क्षेत्रासंदर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करुन, शेतकऱ्यांचा सन्मान करण्याबाबत कृषि विभागाने काढलेल्या परिपत्रकात सूचित केलेले आहे.
- पती-पत्नी मिळून जॉईंट होमलोन घ्याल तर वाचवाल 7 लाखांचा टॅक्स! वाचा जॉईंट होमलोन घेण्याच्या अटी आणि फायदे
- Small Cap Stocks : छोट्या स्टॉकचा मार्केटमध्ये धुराळा, गुंतवणूकदारांना दिला मल्टीबॅगर परतावा…
- महारेराचा ग्राहकांना इशारा! घर घ्यायचे असेल तर घ्या परंतु राज्यातील ‘या’ प्रकल्पात नाही, राज्यातील 212 प्रकल्पांबाबत ग्राहकांना इशारा
- भरधाव कारने मायलेकींना उडवले ! मुलीचा मृत्यू , आरोपीला अटक करेपर्यंत अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांचा नकार
- Thyroid and Weight : थायरॉईडमुळे वजन वाढत असेल तर आजपासूनच लावा या सवयी…