अहमदनगर :- नाशिक व नगरमधील धरणांतून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पाणी विसर्गामुळे जायकवाडी ६५.४१ टक्के भरले आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगरमधून आता जायकवाडीस पाणी सोडण्याची गरज नसून, दोन्ही जिल्ह्यांची चिंता मिटली आहे.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिकमधून ७५ टीएमसीवर पाणी विसर्ग जायकवाडीसाठी केला आहे. गंगापूर धरणात ९०.७१ टक्के साठा कायम असून, त्यातून ५१०४ क्युसेकचा, तर दारणात ८९.६४ टक्के साठा कायम करत त्यातून ५३६० क्युसेक विसर्ग आहे.
कडवातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नांदूर-मधमेश्वरमधून २९ हजार क्युसेकने पाणी विसर्ग सुरूच आहे.शिवाय २ दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता हा विसर्ग पुन्हा वाढण्याची तीव्र शक्यता आहे. त्यातून जायकवाडीस आवक अधिक होईल.
- आदर्श लोकप्रतिनिधी, खासदार आपण दिल्लीला पाठवायचा आहे ! डॉ.सुजय विखे पाटील यांचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून कौतुक
- व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु पैसा नाही! तर घ्या सरकारच्या ‘या’ योजनांचा लाभ आणि मिळवा व्यवसायासाठी पैसा
- Ahmednagar News: लोकसभेच्या आड विधानसभेवर निशाणा! नगर जिल्ह्यात लोकसभेच्या राजकारणात शिजतय विधानसभेचे राजकारण
- Lowest Price Mobile Phone : सॅमसंग, वनप्लस सारखे जबरदस्त फोन झाले स्वस्त, आजच आणा घरी…
- Animal Hit stroke: ‘या’ लक्षणांवरून पटकन ओळखा जनावरांमधील उष्माघात आणि टाळा नुकसान! या उपायोजना ठरतील फायद्याच्या