श्रीरामपूर | सध्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून जागतिक पातळीवर पाचव्या स्थानावरून सातव्या स्थानावर गेली आहे. याला नोटाबंदी हे एक कारण आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत. नवीन उद्योग सुरू नाहीत उलट अनेक कारखाने बंद पडले असून उत्पादन थांबले आहे.
काँग्रेस पक्षाच्या काळात ही परिस्थिती नव्हती, असेही त्यांनी सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रेष्ठी ठरवतील परंतु पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.
श्रीरामपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते शनिवारी बोलत होते. या वेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रभारी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, पंचायत समिती सदस्य अरुण नाईक आदी प्रमुख उपस्थितीत होते. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी प्रास्ताविक करून मतदारसंघातील विकासकामांची माहिती दिली.
या वेळी उपस्थितांपैकी काहींनी उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्षाची नव्याने बांधणी केली जाईल, असे सांगून आता एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
- पहिल्याच दिवशी शिर्डीसाठी 31 अन नगर दक्षिणसाठी 42 अर्जांची विक्री; खा. सुजय विखे, तनपुरेसह ‘यांनी’ घेतलेत अर्ज
- Ahmednagar News : नगर शहरात महिला पोलिसाला मारहाण, पहा काय घडला प्रकार
- Ahmednagar News : उद्योजकास शेतात गाठले, चाकू दाखवत खंडणीची मागणी, अहमदनगरमधील घटना
- आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, गारपीटीची शक्यता ! अहमदनगर अन पुण्यातही पाऊस पडणार का ?
- माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे, तुमच्याकडे काय आहे ? डॉ. सुजय विखे पाटील यांचा विरोधकांवर घणाघात