कर्जत – तालुक्यातील 21 गावांसाठी संजीवनी देणाऱ्या तुकाई चारी योजनेसाठी 100 दशलक्ष घनफूट पाणी मंजूर केले. अनेक पिढ्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने तुकाईचारीचा अनेक वर्षांचा प्रश्न मंत्रिपदाच्या माध्यमातून सोडविला. विविध विकासकामांसाठी भरभरून निधी, विविध योजना आणि खात्यांमधून आणण्याचे काम सातत्याने केले.
यापुढेही मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास करणारच आहे. शेवटी आपल्यातला तो आपलाच अन परका तो परकाच एवढं मात्र खरं असे म्हणत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द येथे वालवड- चांदे खुर्द ते गुरवपिंप्री रस्ता डांबरीकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
शिंदे पुढे म्हणाले, ज्या परिस्थितीत मी माझं आयुष्य जगलो आहे, ते आयुष्य माझ्या मतदाराच्या वाटेला येऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मी माझ्या मतदारांना अभिमान वाटेल असे कार्य जलसंधारण खात्याच्या माध्यमातून केले आहे. कारखानदारी- उद्योग, शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा स्वार्थी विचार कधी मनाला शिवला नसल्याचे ते म्हणाले.
- PM Surya Ghar Yojana: घराच्या छतावर सोलर रूप-टॉप बसवा आणि 300 युनिट वीज मोफत मिळवा! अशा पद्धतीने करा घरबसल्या अर्ज
- Tourist Place: उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणात रेल्वेने प्रवास करून भारतातील ‘या’ ठिकाणांना भेट द्या! प्रवासाचा मिळेल सुखद आनंद
- SBI New Rule: स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता ‘या’करिता द्यावे लागतील जास्त पैसे! स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर हे वाचाच….
- Traffic Rule: तुम्हाला माहित आहेत का ‘हे’ तीन महत्त्वाचे वाहतुकीचे नियम? यामध्ये तुम्हाला पोलीस नाही देऊ शकत त्रास
- शरद पवारांना दिलेला शब्द पाळणार, आ. नीलेश लंके दुपारी राजीनामा देणार !