श्रीरामपूर ;- क्रेनची माल्डी तुटून विहिरीत पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर तीन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी टाकळीभान येथे घडली.
यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत महिलेच्या नातेवाईकांनी घेतली होती.
शांताबाई अरुण धोत्रे (वय ३०, अंतरवली, ता. गेवराई, जि. बीड) ही महिला कुटुंबासमवेत टाकळीभान येथे विहीर खोदाईच्या कामासाठी आली होती.
शनिवारी दुपारी टेलटॅँक परिसरातील एका विहिरीचे काम सुरू असताना क्रेनची माल्डी तुटून विहिरीत पडली. माल्डी शांताबाईंच्या अंगावर पडल्याने त्या जागीच ठार झाल्या.
- नवीन द्राक्ष लागवड करायची असेल तर ‘हा’ वाण ठरेल फायद्याचा! ज्यूस आणि वाईन निर्मितीसाठी आहे प्रसिद्ध व बाजारात देखील असते जास्त मागणी
- Samsung Galaxy : सॅमसंगच्या ‘या’ धांसू फोनची किमत झाली कमी; बघा खास ऑफर…
- पंतप्रधान मोदीच्या धोरणामुळेच कृषि आणि सहकार क्षेत्राला आत्मनिर्भर होण्याची संधी
- Banana Chips Business: दोन लाख रुपये गुंतवणुकीतून सुरू करा केळी चिप्स उद्योग! 50 किलो केळी चिप्स बनवण्यासाठी किती येतो खर्च? वाचा माहिती
- Farmer Success Story: गेल्या 24 वर्षापासून या शेतकऱ्याला आहे भुईमूग पिकाचा हातखंडा! उन्हाळी भुईमुगाचे मिळवतो एकरी 20 ते 22 क्विंटल उत्पादन