नगर :- राजकारण स्वत:साठी नव्हे तर जनतेच्या विकास व कल्याणासाठी केले जाते. केडगाव उपनगर विकासापासून वंचित होते.
येथील जनतेला सुख-सुविधा निर्माण करुन देणे हे पहिल्यापासून शिवसेनेचे स्वप्न होते. केडगावच्या विकासाची स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.
येथील दादागिरी संपुष्टात येऊन, शिवसेनेच्या माध्यमातून विकासाला गती मिळाली आहे.
तर सर्वसामान्य नागरिक भयमुक्तीने वावरत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केले.
केडगाव मधील एकनाथनगर परिसरात स्थानिक नगरसेवकांच्या प्रयत्नाने महापालिकेच्या माध्यमातून बंद पाईप गटार व ड्रेनेजलाईन कामाचा शुभारंभ करताना राठोड बोलत होते.
याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले, नगरसेविका सुनिता कोतकर, शांताबाई शिंदे,
प्रतिभा दारकुंडे, अलका दारकुंडे, मीना येणारे, रत्ना सरोदे, सुनिता कोहक, रेशमा पठाण, लक्ष्मी परबंडोळे आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राठोड म्हणाले, नागरिकांनी आपले प्रश्न नि:संकोचपणे आपल्या नगरसेवकाला सांगितले पाहिजेत. अर्ध्या रात्री देखील नागरिकांच्या कामासाठी मी हजर राहत असतो.
केडगावची परिस्थिती बदलत असून, सर्वसामान्य जनतेचा विकास केंद्रबिंदू मानून शिवसेनेचे नगरसेवक आपले कार्य करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.
- डॉ सुजय विखेंना मिळाले श्रद्धेय भगवान गडांचे आशीर्वाद ! भगवानगडाच्या परिसराच्या विकासासाठी महायुती…
- Supreme Court Decision: ‘स्त्रीधन’ ही पूर्णतः पत्नीची मालमत्ता, त्यावर पतीचा कुठलाही प्रकारचा नसणारा अधिकार! सुप्रीम कोर्टने दिला महत्वपूर्ण निर्णय
- तुम्हाला माहित आहे का की उत्तीर्ण होण्यासाठी किमान 33% का आवश्यक असतात? वाचा यामागील महत्वाचे कारण
- व्यक्तीच्या पायाची बोटे सांगतात त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे आहे? वाचा पायाच्या बोटांवरून एखाद्या व्यक्तीची जीवनशैली कशी ओळखाल?
- Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेल्या मुली घराच्या प्रगतीसाठी असतात महत्त्वाच्या आणि पतीला देतात प्रत्येक पावलावर साथ! वाचा माहिती