त्यावेळी कै.बाळासाहेब विखेंचे म्हणणे ऐकले आणि सुजय विखे आज खासदार झाले….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- नगर दक्षिणेतून सुजय विखे यांनी अडीच लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत विजयाकडे वाटचाल करत आहेत.

सुजय विखे यांनी हा विजय त्यांचे आजोबा ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांना अर्पण केला.

नगर आणि शिर्डीतील निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात विखे पाटलांची ताकद दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी या निवडणुका लढविण्यापेक्षा तु खासदारकीची निवडणूक लढव, खासदार झाल्यावर देशाच्या निर्णय प्रक्रियेच्या सभागृहात सहभागी होता येते.

त्यामुळे जनतेची मोठी कामे करता येतील, असा सल्ला लोकनेते स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी आपणास दिला होता.

म्हणून आपण डायरेक्ट लोकसभेची निवडणूक लढवत असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी निवडणुकीत सांगितले होते. स्व. खासदार साहेबांचा हा सल्ला तंतोतंत खरा ठरला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment