अहमदनगर :- मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे खासदार दिलीप गांधी यांनी नगर भाजप शहर जिल्ह्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे, असे खासदार गांधी म्हणाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या व भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या मोठे यश मिळाले आहे.
अजहर प्रकरणात अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून देण्यात आले होते. त्यामुळे अखेर अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. आता देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या दहशतवाद्यांची गय केली जाणार नाही.
- PCMC Fire Vacancy 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निघाली 150 जागांसाठी भरती; ‘या’ तारखेपासून सुरु होत आहे अर्ज प्रक्रिया!
- शेतमाल घरात नाही तर वखार महामंडळाच्या गोदामात साठवा आणि मिळवा बरेच फायदे! जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- Tata Memorial Centre Bharti : TMC अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना मिळणार नोकरी; वाचा संपूर्ण माहिती
- HDFC Scheme : एचडीएफसी बँकेची खास योजना, फक्त व्याजातूनच कराल बक्कळ कमाई!
- आता सर्व कामगारांना अनिवार्य असणार UAN नंबर? काय होईल यामुळे कामगारांना फायदा? वाचा माहिती