अहमदनगर :गेल्या साडेचार वर्षात पोकळ घोषणा आणि खोटी आश्वासने देवून जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी पट्टयातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी साकळाई योजनेचे गाजर दाखवण्यिाची योजना आखली आहे.
हे गाजर घेवून खुद्द मुख्यमंत्री वाळकीत येणार आहेत. पण त्यांच्याकडून ही योजना पूर्ण होवू शकत नाही. या दुष्काळी भागाला केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच कुकडीचे पाणी मिळवून देवू शकतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केले.
लोकसभेच्या नगर दक्षिण मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मत्रि पक्ष आघाडीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ वाळकी (ता.नगर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील व आ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा झाली.
याप्रसंगी आ. अरुण जगताप, आ.राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, जि.प.सदस्य प्रताप शेळके, माधवराव लामखडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, उद्धवराव दुसुंगे, केशव बेरड, अंबादास गारुडकर, अशोक बाबर, भाऊसाहेब बोठे, रंगनाथ निमसे, रमेश भांबरे, अशोक कोकाटे, ज्ञानदेव दळवी, मनोज भालसिंग, सिताराम काकडे, दादासाहेब दरेकर, शारदाताई लगड, नर्मिला मालपाणी आदी उपस्थित होते.
- मोठी बातमी ! एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, शिर्डीतून यांना मिळाली संधी
- पुन्हा विखे विरुद्ध शरद पवार लढत; नगर दक्षिण लोकसभा कधीकाळी शरद पवारांचे पॉवरहाऊस, पण आता बनला भाजपचा बालेकिल्ला, यंदा कोणाचा विजय ?
- सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निलेश लंकेंच उभे राहणार, निवडणूक देखणी होणार; अहमदनगरमधील काँग्रेसच्या बड्या नेत्याचे वक्तव्य
- महाविकास आघाडीचा शिर्डीचा उमेदवार ठरला, पण UBT शिवसेनेसह मविआत भाऊसाहेबांचा विरोध वाढला, ठाकरे उमेदवार बदलणार का ?
- Ministry of Defence Bharti : मुंबई संरक्षण मंत्रालयात निघाली भरती; ‘या’ उमेदवारांना मिळणार संधी!